पूरबाधित घरांचे परीक्षण, पंचनाम्यांसाठी निवृत्त अभियंते, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मदत घ्या : आयुक्त प्रवीण परदेशी

Share this News:

सांगलीदि. 13/8/2019 : पूरबाधित घरांचे परीक्षण व पंचनामे करण्यासाठी  सेवानिवृत्त अभियंते व अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मदत घ्याअसे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित पूरबाधित घरांचे  पंचनामे प्रशिक्षणात ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडेजिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरीजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊतपोलीस अधीक्षक सुहेल शर्माअप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम आदि व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रवीण परदेशी म्हणालेसद्यस्थितीत पुराचे पाणी ओसरत आहे. नागरिक पुन्हा आपल्या घराकडे राहण्यास परतत आहेत. या परिस्थितीत घराची इमारत धोकादायक स्थितीत आहे किंवा कसेयाचे परीक्षण होणे गरजेचे आहे. पूरबाधित घरांच्या परीक्षणासाठी आणि पंचनाम्यासाठी बांधकाम अभियांत्रिकी क्षेत्रातील माहितगार व्यक्तिंची गरज आहे. त्यामुळे निवृत्त अभियंतेवालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयशासकीय तंत्रनिकेतनकराडच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकाची भूमिकेतून सेवा द्यावीअसे आवाहन त्यांनी यावेळी केले.

प्रवीण परदेशी म्हणालेकोणताही पूरबाधित मदतीपासून वंचित राहू नयेयाची दक्षता घ्यावी. त्यासाठी मालमत्ता नोंदवही किंवा 8 अ उताऱ्यावरील नोंदीसमवेत खातरजमा करून घ्यावी. तसेचप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सर्वांना घरे या धोरणानुसार अनधिकृत घरांच्या पूरबाधितांनाही समाविष्ट करून घ्यावे. हे काम जास्तीत जास्त 3 आठवड्यात पूर्ण करावे. पंचनामे करताना संबंधित घरमालकासह घराचे छायाचित्र घ्यावेअसे त्यांनी स्पष्ट केले.

प्रवीण परदेशी म्हणालेपूरबाधित लोकांना पुन्हा निवारा प्राप्त करून देण्यासाठी काही पर्याय ठेवण्यात आले आहेत. यामध्ये ज्यांची घरे वारंवार पूरबाधित होतातत्यांना अन्यत्र ठिकाणी निवारा उपलब्ध करून देणेपक्क्या घरांच्या पुनर्बांधणीसाठी निधी देणे आणि ज्यांची घरे कच्ची आहेतत्यांना नवीन घरांसाठी निधी देणे आदिंचा त्यात समावेश आहे. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजनेतून 5 ब्रास मोफत वाळू पूरबाधितांसाठी देण्याबरोबरच त्यात मुरूमाचाही समावेश करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेतअसे त्यांनी स्पष्ट केले.

सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी कोणताही पूरबाधित मदतीपासून वंचित राहू नयेयासाठी यंत्रणांनी प्रयत्न करावेतअसे सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरीजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊतअप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदमउपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी यांनी उपस्थितांना पंचनामा कार्यवाहीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.