महिलांच्या अभिव्यक्तीला स्थान द्यायला हवे : डॉ सय्यद तकी आबिदी

Shayri-1.jpeg
Share this News:
पुणे :
‘महिला शायरांना संधी मिळाली तेव्हा त्यांची अनोखी शायरी जगासमोर आली. पुरूषसत्ताक सांस्कृतिक, सामाजिक दडपणांना झुगारून महिलांची शायरीच्या अभिव्यक्तीला समाजात स्थान मिळायला हवे‘, असे प्रतिपादन उर्दू शायरीचे आंतरराष्ट्रीय अभ्यासक कॅनडामधील डॉ. सय्यद तकी आबिदी यांनी केले.
आज बुधवारी सकाळी ‘मौजुदा दौर में निसाई शायरी के रूझानात’ या विषयावरील आझम कॅम्पसच्या असेंब्ली हॉलमध्ये झालेल्या व्याख्यानात ते बोलत होते. या व्याख्यानाला उर्दू शायरीचे चाहते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
अध्यक्षस्थानी एम.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार होते. व्यासपीठावर एम.सी.ई. सोसायटी उपाध्यक्ष आबेदा इनामदार, मुनव्वर पीरभॉय, मुमताझ पीरभॉय, डॉ.एन.वाय.काझी, डॉ.मुश्ताक मुकादम उपस्थित होते.
डॉ. आबिदी म्हणाले,‘ औरत का अंदाज -ए- बयान और है’, असे गालिबनेच लिहून ठेवले आहे. 1818 ला पहिल्या शायरान साहेबाँ दिवान यांच्या शायरीची नोंद झाली.
‘पुरुष थेट शब्दात आपल्या भावना व्यक्त करू शकतात. मात्र स्त्रियांना सामाजिक, कौटुंबिक, सांस्कृतिक तसेच स्वत:चेही दडपण असते. टिकाकारांचे भय असते. मात्र, पुरूषसत्ताक सामाजिक व्यवस्थेत महिलांना संधी मिळाली तर त्या अनोखी शायरी पेश करू शकतात.’
‘महिलांना सर्व मानवी हक्क मिळालेच पाहिजेत, पण अभिव्यक्तीला वाव देणे अधिक महत्वाचे आहे. सौंदर्य, रोमान्स विषयावरील शायरीपेक्षा रचनात्मक शायरीला महत्व दिले पाहिजे.’
डॉ. मुश्ताक मुकादम यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आबेदा इनामदार यांच्या हस्ते डॉ. सय्यद तकी आबिदी यांचा सत्कार करण्यात आला.