माजी सैनिकांच्या पाल्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Share this News:

मुंबई दि. 22 : माजी सैनिक/माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती मिळण्याकरिता अर्ज करण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

 

मुंबई शहराच्या कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या माजी सैनिक/ माजी सैनिक विधवा व त्यांच्या अवलंबितांनी शैक्षणिक वर्ष 2018 -19 मध्ये दहावी आणि बारावीडिप्लोमा आणि पदवी परीक्षेत 60 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत आणि शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये शिक्षण घेत आहेतअशा पाल्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.शिष्यवृत्ती मिळण्याकरिता 15 ऑक्टोबर 2019 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयमुंबई शहरजुने जकात घरफोर्टमुंबई –01 येथे अथवा 022- 22700404 यांच्याशी संपर्क साधावा.