टांगेवाला कॉलनीतील नागरिकांचे पुनर्वसन करा- आम आदमी पक्षाची मागणी

Share this News:
28 /9/2019, पुणे:
परवा झालेल्या अतिवृष्टीमुळे पुण्यातील ज्या भागाचे सर्वाधिक नुकसान झाले त्यातील एक भाग म्हणजे टांगेवाला कॉलनी. ही कॉलनी पानशेत पूरग्रस्तांची कॉलनी आहे. गेल्या वीस वर्षापासून तिथे शेकडो कुटुंबे राहत आहेत. परवाच्या ढगफुटीमुळे या वस्तीमध्ये आंबील ओढ्याचे पाणी शिरले. 5 जण वाहून गेले. यात 1 महिला व 2 बालकांचा समावेश आहे. पुणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला. प्रशासकीय गलथानपणाचा फटका नागरिकांना जीवानिशी बसला.
काल व आज आम आदमी पक्षाचे पार्वती मतदारसंघाचे उमेदवार संदीप सोनवणे यांनी पूरग्रस्तांशी चर्चा केल्यानंतर टांगेवाला कॉलनीतील नागरिकांचे सुरक्षितस्थळी पुनर्वसन करा अशी मागणी केली आहे. याबाबत उद्या ते पुणे मनपा आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.